Posts

Showing posts from September, 2024

अकोले-निळवंडेच्या डाव्या कालव्याला दशरथ सावंत यांचे नाव द्या-संतोष नाईकवाडी

Image
अकोले-अकोले तालुक्यातील राजकीय,सामाजिक,कृषी चळवळीत योगदान दिलेल्या दशरथ सावंत यांचे नाव निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याला देण्यात यावे अशी मागणी संतोष नाईकवाडी यांनी केली आहे त्यांनी म्हटल आहे की 1976 च्या क्रांतिकारी लढ्यात दशरथ सावंत साहेब हे तुरुंगात गेले होते.त्यानंतर बी.जे खताळ साहेब यांनी निळवंडे धरणाचे म्हाळादेवी येथे पाटबंधारे मंत्री बी जे खताळ साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन केले.  तद्नंतर तुरुंगातून ज्येष्ठ नेते दशरथ रावजी सावंत साहेब सुटून आल्यानंतर यांनी स्थानिक रहिवासी यांच्या मदतीने म्हाळादेवी निळवंडे येथील ग्रामस्थांच्या मदतीने धरण जागा  बदलाची मोहीम हाती घेतली.व या सर्व गावातील सुपीक जमीन वाचून दिगंबर गाव मधील कोरडवाहू जास्त ची जमिन तसेच निळवंडे मधील व निंब्रळ मधील काही अंशी कोरडवाहू जमिनी जाऊन आज त्या ठिकाणी निळवंडे धरणाची निर्मिती झाली. आज आनंद या गोष्टीचा आहे की म्हाळादेवी या गावीचे आज धरण बदलामुळे सुजलाम सुफलाम झाली आहे.लाभक्षेत्रातील तीन ते चार गावे आज सुपीक व प्रकल्पात जाण्या पासून वाचल्याचे  श्रेय फक्त दशरथरावजी सावंत साहेब यांच्यामुळे आहे....

संगमनेर-आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने श्री. बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथे भेट घेतली.

Image
संगमनेर-मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये किमान 12 जागा महाविकास आघाडीने सोडाव्यात, तसेच महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम ठरवत असताना  त्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी, श्रमिकांचे सर्व प्रमुख मुद्दे त्यामध्ये यावेत अशी मागणी केली.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगली मदत केली. विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला या पार्श्वभूमीवर योग्यरीत्या सामावून घेतले जाईल, तसेच किमान समान कार्यक्रम व निवडणूक जाहीरनामा बनवण्याच्या प्रक्रियेतही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आग्रह प्राधान्याने  विचारात घेतले जातील असे श्री. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.राज्यात शेतकरी कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सातत्याने श्रमिकांच्या या सर्व प्रश्नांबाबत नेटाने संघर्ष करत आहे. महाविकास आघाडीने ही या सर्व श्रमिकांच्या प्रश्नांमध्ये अधिक सजगतेने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे प्रश्न कशाप्रकारे सोडवले जातील याबद्दलही ...