Posts

Showing posts from October, 2025

देवठाण-बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय कविता गांगड मयत

Image
अ कोले तालुक्यातील देवठाण गावातील शेळके वस्ती नजिक राहणाऱ्या लहानु पोपट गांगड यांच्या कविता गांगड या चार वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मुर्त्यु झाल्याची घटना समोर आली आहे.देवठाण येथिल रहिवासी असणाऱ्या मोहन शेळके यांच्या वस्ती नजिक ही घटना घडली आहे.सदर घटना कळताच ग्रामस्थ व वनखाते हे तत्परने घटनास्थळी दाखल झाले माञ शोधाशोध केल्या नंतर कविता गांगड या मुलीचा मृतदेह महेश मोहन शेळके यांच्या उसाच्या शेतामध्ये ३००मीटरवर आढळून आला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते व देवठाण ग्रामस्थ यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे यापूर्वी ही देवठाण गावतील रामहारी काळे यांच्या वस्तीवर ही हल्ला झाला होता या हल्यात विठावाई रामहारी काळे यांचा मुर्त्यु झाला होता वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे अकोले तालुका हा भयभयीत झाला आहे.तरी वनविभागाने तातडीने कारवाई करत नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी पंचायत समितीचे अरुण शेळके, किसान सभा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जालिंदर बोडके,सुधीर शेळके, महेश सोनावणे,किशोर घावटे आदिंनी धावपळ करत ग्रामीण रुग्णालय कोतुळ या ठिकाणी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आह...

उमेद उपक्रमामुळे महिला बचत गटाला नवसंजिवनी

Image
  काल अकोले  सुंदर अशी उद्योजक महिला आणि मुंबई येथे मॉलचे संचालक यांची एक बायर सेलर मीटिंग पार पडली.या मीटिंगमध्ये तालुक्यातील अनेक महिला त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट घेऊन अतिशय उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.ग्रुपचे संचालक यांनी सुद्धा खूप चांगलं महिलांना मार्गदर्शन केलं महिलांचे उत्पादन समजून घेतली जाणून घेतली.कळसुबाई महोत्सव त्यानंतर रानभाज्या महोत्सव आणि त्यानंतर आज झालेली बायसेलर मीठ ही एक महिलांसाठी नवक्रांती ठरणार आहेयासाठी विशेष मेहनत अविनाश कानवडे सर कासार ताई विदुलाताई यांनी घेतली.काल झालेल्या अकोल्यात उमेदी उपक्रमाच्या अंतर्गत एक उल्लेखनीय बायर-सेलर मीटिंग पार पडली. या बैठकीत अकोल्यातील उद्योजक महिला आणि मुंबई येथील प्रतिष्ठित TGMG मॉलचे संचालक सहभागी झाले. या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना त्यांच्या उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याची संधी निर्माण झाली आहे.उमेद चे कुंदन कोरडे साहेब,पशुसंवर्धन विभागाचे डॉ अशोक धिंडले उपस्थित होते.कळसुबाई महोत्सव, रानभाज्यांचा महोत्सव, मंगळागौर, आणि दांडिया महोत्सव अशा विविध उपक्रमांमुळे ग्रामीण महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण ह...